आज राष्ट्रीय युवक दिन...
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस....
"दिवसभरात तुमच्या पुढे एकहि समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकहि प्रश्न
पडला नाही तर तुमच्या आयुष्याच्या प्रवास चुकीच्या रस्त्यावरुन सुरु आहे अस
समजायला हरकत नाही"....
हे स्वामी विवेकानंद यांचे
वाक्य पण आजच्या आमच्या पिढीला हे आवडत नाही कारण आम्हाला समस्या नको असतात सगळ्या
गोष्टि झाल्या पाहिजेत आणि त्याही सहज आणि कोणत्याही त्रासाशिवाय मग ती कोणतीही
गोष्ट असो…..
आमच्या तरुण्याला आणखी एक शाप आहे तो
म्हणजे वाट न बघण्याचा. आम्हाला सगळ्या गोष्टी इंस्टेंट लागतात. "सब्र का फल
मीठा होता है।" पण हे 'सब्र'
नावाच फळ पण आम्हाला लगेच हव असते. आणि या साठी आम्ही
काहीही करू शकतो( काहीही चा अर्थ कहिहिच ) मग तो मार्ग so
called सन्मार्ग असो वा नसों.
आजचा युवक हा देशाचा भावी आधारस्तंभ असतो. आणि भारतात
युवकांची संख्या सर्वाधिक आहे. या शक्तीचे केंद्रीकरण होणे गरजेचे आहे. केंद्रीकरण
झाले तर आणि तरच त्या शक्तीचे विधायक कार्यात रूपांतर होऊ शकते. नाही तर सध्या आपण
बघतो की हीच शक्ती कुठल्या मार्गाने आणि
कशी वापरली जाते.
असो आजचे आम्ही तरुण हुशार आहोत, शिक्षित आहोत, (संस्कारित आहोत) त्यामुळे आम्हाला या गोष्टी कळतात पण 'वळत नाहीत'. आम्हाला फ़क्त त्या वळवुन घ्यायाचा प्रयत्न करायचा आहे.
स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन व सुधारण्याचे
अभिवचन.....
© संदिप