मेरे प्यारे देशवासीयो, आज मध्य रात्री यानी ८ जून २०१९ की रात्री को बारा बजे से वर्तमान में जारी सभी मोबाईल फोन बंद होंगे। यानी आज रात्री से आपके फोन में किसीं भी प्रकार का नेटवर्क या इंटरनेट उपलब्ध नहीं होगा। आपके फोन में उपलब्ध सभी जानकारी हम तकनीकी मदत से मिटा देंगे और आपका फोन केवल एक प्लास्टिक का डिब्बा रह जायेगा। फोन का आना-जाना लीगल है, लेकिन उसके लिए आपको दुसरा एक फोन लेना पडेगा। जिस में सिर्फ बात करने और सूनने की सुविधा आपको मिलेगी और ये फोन कल से आपके नजदिकी दुकानो में उपलब्ध होंगे। ये कदम हम ने समाज और देश के विकास, उनकी ऊर्जा को बढाने के लिए उठाए है। मैं आप सभी को आश्वस्त करता हूँ की समाजहित और आपके हक्क की पुरी रक्षा की जायेगी। ये लढाई इस देश हर एक सामान्य नागरिक की लढाई है। आपको कोई चिंता करने की जरूरत नहीं है।
ही ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर पहिली आणि पायाखालची जमीन सरकली. आपल्या जवळचे अचानक आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर होते ती अवस्था झाली. हातातील लाडका मोबाईल आणि टीव्हीवरील बंदीची बातमी या दोन्हीकडे बघत वेळ बघितली तर रात्रीचे ८ वाजले होते, म्हणजे माझा मोबाईल आता फक्त चार तासाचा सोबती होता. मी मोबाईल बघितली तर त्याची स्क्रीन केविलवाणी वाटत होती. उरलेल्या चार तासात काय करायचे हेच मला सुचत नव्हते. सिनेमात Hour glass मधून वाळू निसटावी तसा वेळ संपत होता.
टीव्हीवर ऐकलेली बातमी ची सत्यता पडताळणीसाठी एका-दोघांना फोन केला तर त्यांची अवस्था माझ्याहून बिकट होती. बोलायलाही त्यांना वेळ नव्हता. माझ्यापुढेही करायच्या गोष्टीचा डोंगर होता. आपला फोन वाचणार नाही पण त्यातील काही गोष्टी वाचवण्याचे आव्हान होते. आपला फोन म्हणजे आपला पाऊण मेंदूचं असतो आणि येणाऱ्या चार तासानंतर ते सर्वच संपणार होते. फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, मेसेज, व्हाट्सअप्प चॅट असे काय-काय आणि किती-किती करायचे यातच बारा वाजण्याचा ठोका जवळ आला. मोबाईल मध्ये ११.५९ मिनिटे झाली आणि फोन बंद झाला तो पुन्हा चालू न होण्यासाठी. आता तो फक्त एक प्लास्टिकचा डब्बा होता.
त्या रात्री मला झोपच आली नाही. फोन शिवाय आता काय होणार? या अस्वस्थेमुळे झोपच आली नाही. सकाळ झाली पण मोबाईलमध्ये गजर झाला नाही. सकाळी सर्वात आधी फोन बघायची सवय हाताला झाल्यामुळे हात आपोआप त्या दिशेला गेला पण हाताला काही लागले नाही. वेळ बघण्यासाठी घरातील भिंतीवरील घड्याळ शोधावे लागले.
आज कित्येक वर्षाने सकाळची सेल्फी मिस झाली. दररोज चहा बरोबर मोबाईल असे पण आज चहा बरोबर घरातल्याच्याशी बोलताना चहाची चव ताजी वाटली. मोबाईल नसल्याची बैचेनी जात नव्हती. हेच दुःख सांडण्यासाठी मित्रांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो पण फोटो,व्हिडीओ साठी फोन नव्हता. आम्ही फिरायला गेली, धमाल-मस्ती केली हे इतरांना कळणार कसे? पण मस्त वाटले. निसर्ग फोटोत साठवण्यापेक्षा अनुभवण्याचा आनंद मोठा होता. दुपारच्या जेवणाचा फोटो सोशल मीडियावर टाकता आला नाही पण जेवणाची चव अप्रतिम होती.
परत आल्यानंतर बोलण्यासाठी तरी फोन घेऊया म्हणून बाहेर पडलो तर दुकानांच्यासमोर इतकी मोठी लाईन होती की माझा नंबर येणे अशक्य होते. नाराज मनाने घरी आलो. कशातच मन लागत नव्हते . घरातील पुस्तकाचे कपात उघडले. पुस्तक वाचायला घेतले. मनाला आधार वाटू लागला. दिवसभर चॅटिंग नसल्यामुळे बोटांना आराम होता. झोप येण्याची वाट न बघता झोपी गेलो. घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर माझ्या चेहऱ्यावर नाराजी होती.
दिवस सरकू लागले. व्हाट्सअँप, फेसबुक,इंस्टाग्राम, टिक-टॉक,ट्विटर, PUBGयांच्या आठवणीतून बाहेर पडू लागलो. आता मोबाईल नसण्याची सवय झाली. मोबाईल नसण्याचे दुःख विसरून गेलो होतो. मोबाईलमुळे आठवणी जगण्यापेक्षा साठवण्याची जडलेली सवय आता आठवणी भरभरून जगण्यात बदलली होती.
इतक्यात मोबाईलमध्ये गजर वाजला. सकाळचे आठ वाजले होते. मी झोपेतच गजर बंद केला, पण हाताला मोबाईलच्या स्पर्शाने डोळे लख्ख उघडले. माझा फोन माझ्या हातात होता, अगदी सुस्थितीत. मी जे पाहिले ते एक भयंकर स्वप्न होते. मनात जग जिंकल्याचा भाव होता. फोन दोन्ही हातात घेऊन बराच वेळ बसलो. आईच्या चेहऱ्यावर 'आग लाव त्या फोन ला' चे भाव होते पण मी मात्र भरून पावलो होतो.
पण खरोखर असे घडले तर....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
© संदीप...
📱9730410154
sandip.koli35@gmail.com