Sunday, 30 June 2024

Leave while you are at the top of the game

🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏

29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर्षापासून असलेल्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ रोहित आणि टीमने संपवला आणि पूर्ण देशातच एक जल्लोष सुरू झाला. खरेतर सातत्याने इतकं छान क्रिकेट खेळत असताना " हाथ आया लेकिन मुंह ना लगा।" अशी अवस्था भारताची होत होती. गेल्या वर्षभरात भारत तीन वेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनल पर्यंत पोहोचला पण यशाला गवसणी घालण्यापासून काही क्षणांनी मात दिली होती, पण आज तो सुवर्णक्षण अवतरला आणि भारतीय टीमने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 
           भारतीय टीम ही सातत्याने अतिशय उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती त्यामुळे आजचा सामना हा भारतीयांसाठी प्रचंड महत्त्वाचा होता. एकीकडे भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा अभिमान आणि कौतुक होत असताना दुसरीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी T20 मधून घेतलेली निवृत्ती ही सुद्धा मनाला कुठेतरी बोचणी लावून जाणारी आहे. भारतीयांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू. 
        पण का??? दोघेही इतका चांगला खेळ खेळत असताना अचानक अशा निवृत्तीची गरज होती का??? त्यांनी अजून काही वेळ वाट बघायला पाहिजे होती का??? 
         नाही.... त्यांनी घेतलेला हा निर्णय माझ्यामते सर्वोत्तम आहे. तुम्ही अशा वेळेला निवृत्ती घेत आहात की ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असाल तर निवृत्ती तुमच्यासाठी खूप फलदायी ठरत असते. रोहित व विराट सध्या या प्रकारात सर्वोच्च स्थानावर आहेत. अजून काही काळ ते खेळत राहतील. अतिशय उत्तम ही खेळतील यात शंका नाही, पण आज जो क्षण त्यांच्या आयुष्यात आला आहे तो पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही आणि अशा वेळेला सर्वोच्च शिखरावर असताना त्यातून बाजूला होणं ही खूप मोठी उपलब्धि दोघांनी साधली आहे. 
          या निर्णयामुळे ज्या- ज्या वेळेला t20 फॉरमॅटचा उल्लेख होईल त्यावेळी या दोघांची नावे तितक्याच अभिमानाने घेतली जातील. त्यांचा हा निर्णय सर्व क्षेत्राला लागू पडतो. तुम्ही ज्या वेळेला यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतात त्यावेळेला तिथून बाजूला जाणे हेच तुमचे खरोखरच यश असचे. Leave it when you are at peak. 
          रोहित आणि विराट या पुढेही भारतीय क्रिकेटसाठी कसोटी आणि वनडे च्या माध्यमातून योगदान देत राहतील यात शंका नाही. त्यांच्याकडे अजून खूप खेळ बाकी आहे याबद्दल खात्री आहे. दोघांनाही कसोटी व वनडे फॉरमॅटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि t20 साठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद.....
        भारतीय संघ आणि रोहित टीमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन..

✒️ संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...