Monday, 15 July 2019

गुरुपौर्णिमा Gurupornima

 गुरुपौर्णिमा 

 आदरणीय गुरुवर्य......

                           गुरु, कोणाला म्हणणार आपण गुरु? आपलं जगणं घडवणारा.....पावलांना बळ देणारा, कठीण वाटेवर मुद्दाम नेऊन सोडणारा...... पण गुरु म्हणजे आधाराची कुबड़ी नव्हे, हात पसरुन मदत मागत बसण्याची जागा नव्हे......तो जगायला शिकवतो, तो लढ़ायला शिकवतो.....त्यांनी पाठीवर हात ठेऊन नुसतं म्हंटल तरी अंगात दहा हत्तीच् बळ येतं.......आणि मनाच्या गाभाऱ्यात चैतन्याचा संचार होऊन प्रेरणाना उधान येत......
      गुरु कोठे भेटावा...... आपल्याच माणसात... आपल्याच सभोवती....
                        दोन देशात युद्धाची तयारी सुरु असते.समोरच्या देशातील सैनिकाची युद्धाची तयारी बघुन सैनिक आपल्या सेनापतीला विनंती करतात की आपण नाही जिंकू शकणार त्याच्या विरोधात. सेनापती नाईलाजाने आपले मत राजा समोर मांडतो. राजा   विचारात पडतो. अशा पेच प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी राजा आपल्या गुरुचे मार्गदर्शन घेतात. गुरुआज्ञेप्रमाणे राजा आपल्या सर्व सैनिकाना घेऊन गुरुकड़े जातात. गुरु सर्व सैनिकांकडे बाघतात व सर्वाना उद्देशून सांगतात की आपल्या अडचणी मला माहित आहेत फ़क्त आपण एकदा देवाचा कौल घेऊया मग आपण लढाई करायची की नाही ते ठरवू. देऊळात थोडा वेळ घालवून गुरु बाहेर येतात व सांगतात की कौल आपल्या बाजूने आहे. आपणच जिकणाऱ.......सैनिक जोमने लढतात व बलाढ्य शत्रुची दाणादाण उडवतात. जिंकल्यावर राजा गुरुला भेटायला जातो व विजयाचे गुपित विचारतो. या वर गुरु स्मित हास्य करुण म्हणतात की मला तरी कुठे माहित होत मी फ़क्त प्रेरणा दिली त्याचा आत्मविश्वास वाढवला. लढाई तर तुम्हीच जिंकली तुमच्या कर्तुत्वावर.......
                      आपण ही माझ्या आयुष्यात असेच आलात. आपली भेटही अशाच एका वळणावर झाली. आपण मला वाट दाखवली. विचारांची पद्धति शिकवलीत. आपण मला प्रश्नाच्या गर्दीत सोडलतं. उत्तरे माहित असूनही ती मला शोधायला लावलीत. विचाराच्या विशाल जगात आपण मला स्वतंत्र पायवाट शोधायला शिकवलीत. प्रसंगी आधार दिलात व जबाबदारीही. ठेच लागून पडलो तर आधारही आपणच दिलात व पुन्हा उठून मार्ग चालण्याचे बळ ही आपणच दिलेत. वाटेत अडचणी आहेत, धोके आहेत म्हणून मागे न फिरता धेय्या पर्यंत चालायचे हे ही आपणच शिकवलत. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन स्वताच्या मनासारखे जगायला आपण शिकवलत. कष्ट करूनही आनंदात जगायला आपण शिकवलत. 
                   जग बदलले, काळ बदलला, वेळ बदलली तरी आपले मोल कमी होणार नाही. कोणतेही यश एकट्याच नसतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणाऱ्याकडून काही ना काही चांगल घ्यावे हे आपण शिकवलंत.
          म्हणून गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या ऋणात राहून आपल्यविषयी  कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुवर्णयोग........
आपल्याला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप....
9730410154
sandipkoli35@gmail.com


 

Monday, 8 July 2019

Keep it Simple

Keep it Simple.....
       काही दिवसांपूर्वीच आयपीएल संपले. आपण सर्वांनी कमी-जास्त प्रमाणात मॅचेस बघितले असतील. आपण कोणत्याही टीमचे सपोर्टर असलो तरी एका टीमची कायम चर्चा राहिली ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. कोणी सपोर्टला असो, विरोधात असो किंवा फक्त क्रिकेट शौकीन असो, सिनिअर लोकांची टीम म्हणून चिडवलेली टीम 2019 च्या आयपीएल फायनल पर्यंत आली याचे एकमेव कारण म्हणजे टीमचा कॅप्टन एम एस धोनी. कागदावर मजबूत असूनही  जे इतर टीम करू शकल्या नाही ते CSK ने करुन दाखवले. या यशाचे रहस्य कॅप्टन धोनी ला विचारले त्यावेळी त्याने सांगितलेली दोन वाक्य खूप महत्त्वाची होती. त्यातील पहिले वाक्य होतं एवढ्या मोठ्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी व भूमिका माहीत आहे आणि दुसरं वाक्य म्हणजे Keep it Simple. धोनीने  सांगितलेली ही दोन वाक्य CSK च्या यशाची गमक असली तरी आपल्या ही बाबतीत ही वाक्य तंतोतंत लागू पडतात. धोनीचा यशाचा हा फॉर्म्युला आपल्या जीवनाच्या गणितालाही तितकाच समर्पक बसतो.
              आपल्या दररोजच्या उलाढालीत आपल्याला आपली जबाबदारी व भूमिका माहित असणे गरजेचे असते. नाहीतर आपली स्थिती ही भरकटलेल्या शिडाच्या होडीची सारखी होते की जिला किनारा हे सापडत नाही आणि सहारा ही सापडत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी व भूमिका प्रत्येकाने ठरवली पाहिजे.
         धोनीच्या यशाच्या सूत्राची सर्वात मोठी Key म्हणजे धोनीचे दुसरे वाक्य Keep it Simple.  गोष्टी सरळ, साध्या आणि सोप्या ठेवा. म्हणायला, ऐकायला, समजायला एकदम सोपी वाटणारे हे तीन शब्द प्रत्यक्ष जगायला तितकेच कठीण असतात म्हणून आपला गुंता वाढत जातो.
           आपल्या बाबतीत घडणार्‍या अनेक गोष्टी आपण घडलेली किंवा घडणारी गोष्ट आहे तशी न स्वीकारता, ती आपल्याला हवी तशी स्वीकारतो आणि यातच आपली फसगत होते. आपल्यासमोर येणाऱ्या गोष्टी किंवा परिस्थिती प्रत्येक वेळी वेगवेगळी असू शकते. त्यावेळी त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपली दिशा ठरवतो, की त्यामध्ये आपण फसणार आहोत की हसणार आहोत. हाच ॲटीट्युड परिस्थिती बदलणार असतो.
         आपल्या समोर असणारा सहा अंक दुसऱ्या बाजूला असणाऱ्याला नऊ दिसतो याचा अर्थ तो चुकीचा आहे असा होत नाही. तो त्याच्या बाजूने आणि आपण आपल्या बाजूने शंभर टक्के बरोबर असतो.
         कोणत्याही स्थितीत तीन बाबी खूप गरजेच्या असतात. प्रथम ती स्थिती शांतपणे समजून घेणे ही खूप मोठी बाब असते. अशावेळी आपण काय करू शकतो हे निश्चित ठाऊक असले पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट काही वेळा समोरच्या स्थितीनूसार समजावून देणे ही जबाबदारी ही पार पाडावी लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे माघार घेणे. योग्य वेळी back out  करणे हे ही गरजेचे असते. ती माघार आपल्या फायद्याचे असते. या बाबींने आपण सारासार विचार केला तर आपण ती स्थिती सोपी होऊ शकते. आपल्या बाबतीत अनेक वेळा बोलून सुटणारे प्रश्न आपण ग्रह करून ऑप्शनला ठेवून त्या प्रश्नांचा त्रास करून घेतो.
          काही तरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आणि स्वतःच्या काही स्थिर धारणांच्यामुळे सरळ गोष्टीचा आपण गुंता करून ठेवतो आणि मग तो गुंता सोडवण्यात आपली दमछाक होते, म्हणून तो गुंता होण्याआधीच आपण त्याला सामोरे जायला हवे, आणि त्यासाठी महत्त्वाची चावी म्हणजे Keep it Simple.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

© संदीप कोळी.
📱9730410154
sandip.koli35@gmail.com


आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...