आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस......
लाथ मारेल तिथे पाणी काढणाऱ्या वयोगटाचा दिवस, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने कवेत घेऊन फिरणाऱ्या जिंदादिल लोकांचा समूह, कोणालाही न जुमानता आपल्या गोष्टी खऱ्या करणाऱ्यांचा गट, आपल्या कर्तृत्वाने दुनिया को अपने कदमो के निचे लेनेवालो का समूह, प्रत्येक राष्ट्राच्या जडणघडणी मधील महत्वाचा स्तंभ........
पण खरंच असे आहे का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय सांगते? Each coin has two sides तसे सळसळत्या तरुणाईचे हि दोन पैलू नक्कीच आहेत. एक बाजू समाजाला lead करणारी तर दुसरी बाजू समाजाला विचार करायला लावणारी. तसे बघायला गेले तर ह्या दोन्हीही पैलुला आपल्या सभोवतालचे वातावरणच कारणीभूत ठरते.
मी, आपण या तरुणाईचा भाग आहोत. या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्या समोर समाज चुकीचे आदर्श समोर करतो. आपला समाज विचारापेक्षा पैशाला, आचारापेक्षा दिसण्याला व प्रत्येक्षापेक्षा आभासाला जास्त महत्व देतो. थोडक्यात आपल्या समाजात 'असण्यापेक्षा दिसण्याला' जास्त महत्व आहे. याचा Direct खूप मोठा व विपरीत परिणाम तरुणावर होतोय. त्याच्यामध्येही असण्यापेक्षा दिसण्यावर भर दिला जातोय. तरुणाईने आपल्या सभोवती असे आभासी जग निर्माण केले आहे.
"काय भुललासी वरलीया रंगा" असे पटवून सांगणाऱ्या तुकारामाच्या सारख्या जिवंत विचाराच्या पायावर भक्कम समाज उभे राहणे हि काळाची गरज आहे. वैचारिक मूल्याचे अधिष्टान निर्माण करून चांगले आदर्श व त्याचे विचार याची मालिका तरुणासमोर उभी करणे ही काळाची गरज आहे. अल्फेड नोबेल ने 'डायनामाईट' चा शोध चांगल्या हेतूने लावला होता पण प्रत्यक्ष वापर विघातक झाला. त्याप्रमाणे तरुणांच्यात असणाऱ्या Potential चा वापर कसा करायचा हे त्याच्या भोवती असणारे वातावरण, सहवास थोडक्यात समाजावर अवलंबून असते.
म्हणून आजच्या या दिवशी तरुणांना व मनाने तरुण असणाऱ्याना सर्वाना थोड्याशा वैचारिक शुभेच्छा
लाथ मारेल तिथे पाणी काढणाऱ्या वयोगटाचा दिवस, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने कवेत घेऊन फिरणाऱ्या जिंदादिल लोकांचा समूह, कोणालाही न जुमानता आपल्या गोष्टी खऱ्या करणाऱ्यांचा गट, आपल्या कर्तृत्वाने दुनिया को अपने कदमो के निचे लेनेवालो का समूह, प्रत्येक राष्ट्राच्या जडणघडणी मधील महत्वाचा स्तंभ........
पण खरंच असे आहे का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय सांगते? Each coin has two sides तसे सळसळत्या तरुणाईचे हि दोन पैलू नक्कीच आहेत. एक बाजू समाजाला lead करणारी तर दुसरी बाजू समाजाला विचार करायला लावणारी. तसे बघायला गेले तर ह्या दोन्हीही पैलुला आपल्या सभोवतालचे वातावरणच कारणीभूत ठरते.
मी, आपण या तरुणाईचा भाग आहोत. या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्या समोर समाज चुकीचे आदर्श समोर करतो. आपला समाज विचारापेक्षा पैशाला, आचारापेक्षा दिसण्याला व प्रत्येक्षापेक्षा आभासाला जास्त महत्व देतो. थोडक्यात आपल्या समाजात 'असण्यापेक्षा दिसण्याला' जास्त महत्व आहे. याचा Direct खूप मोठा व विपरीत परिणाम तरुणावर होतोय. त्याच्यामध्येही असण्यापेक्षा दिसण्यावर भर दिला जातोय. तरुणाईने आपल्या सभोवती असे आभासी जग निर्माण केले आहे.
"काय भुललासी वरलीया रंगा" असे पटवून सांगणाऱ्या तुकारामाच्या सारख्या जिवंत विचाराच्या पायावर भक्कम समाज उभे राहणे हि काळाची गरज आहे. वैचारिक मूल्याचे अधिष्टान निर्माण करून चांगले आदर्श व त्याचे विचार याची मालिका तरुणासमोर उभी करणे ही काळाची गरज आहे. अल्फेड नोबेल ने 'डायनामाईट' चा शोध चांगल्या हेतूने लावला होता पण प्रत्यक्ष वापर विघातक झाला. त्याप्रमाणे तरुणांच्यात असणाऱ्या Potential चा वापर कसा करायचा हे त्याच्या भोवती असणारे वातावरण, सहवास थोडक्यात समाजावर अवलंबून असते.
म्हणून आजच्या या दिवशी तरुणांना व मनाने तरुण असणाऱ्याना सर्वाना थोड्याशा वैचारिक शुभेच्छा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
संदिप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment