हाय फ्रेंड्स..बघता बघता उन्हाळा संपत आला. परीक्षा, आयपीएल चा सिझन संपलासुद्धा आणि आंब्याचा सिझन जवळपास संपत आला. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे वातावरणात ऋतू बदलाचे वारे वाहू लागले आहे.
वातावरणातील सौम्यतेमुळे गप्पाचे अड्डे पुन्हा रंगू लागले आहेत. सगळेच फ्री असल्यामुळे वेळेची कमतरता जाणवतच नाही. गप्पा रंगल्या कि कधी-कधी त्याचा पतंगच होतो. अशाच गप्पा रंगल्या होत्या. 'सच्या' एक वायर घेऊन आला " भावांनो भारतात 5G येणार". गप्पांचा विषयच पालटला. मोबाईल आणि इंटरनेट हे तर 'जवा दिलो की धडकन' म्हणजे अगदी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाबरोबर मोबाईल आणि इंटरनेट हि लागतेच इतका जिव्हाळ्याचा विषय. जीवनातील आवश्यक गोष्टीतील Compulsory वस्तू म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट शिवाय मोबाईल 'किस काम का'. 'सच्या' ने छेडलेल्या विषयात 'परश्या' उतरला, "होय रे मी पण ऐकलंय". तेवढ्यात अभ्यासातला किडा 'राहुल्या' नेहमीच्या नारीजीच्या स्वरात म्हणाला " मग त्यानं काय फरक पडणार आहे. आताही इंटरनेट आहेच की, 4G मुळे स्पीड पण आहे". यावर मात्र आमचा इंटरनेट तज्ञ 'विक्या' चिडला, "तुला काय कळतंय त्यातलं, 5G आलंच पाहिजे. इंटरनेट चे स्पीड भयानक वाढेल. आता आपल्याला 3 तासाचा पिक्चर डाउनलोड करायला अर्धा-एक तास लागतो पण 5G आल्यावर तो 3 तसाचा HD पिक्चर 1 सेकंदात डाउनलोड होईल. जग आणखी जवळ येईल कळलं का? म्हणे काय फायदा?" 'विक्या' आवेशात 5G ची वकिली करत होता जस काय टेलिकॉम कंपन्या 5G चा ब्रँड एम्बेसडर करणार आहेत. फायद्या-तोट्याच्या जुगलबंदीत 5G ची चर्चा रंगतदार झाली.
भारतात 2019 पर्यंत 5G येण्याची शक्यता आहे. पण याची सुरुवात 1G पासून झाली होती हे आपल्याला माहीतच नाही. त्याचा वापर फक्त कॉलिंग साठी होत होता. त्यानंतर 2G आले त्यात sms व इतर सुविधा आल्या. 3G आले व इंटरनेट युगात क्रांती झाली. ब्राउजिंग, ईमेल, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअरिंग आले. माणसाबरोबर फोनही स्मार्ट झाला. त्यानंतर 4G आले व स्मार्ट फोन चा वापर आणखी स्मार्ट झाला. स्पीड वाढले दररोजच्या 1 ते 1.5 gb डाटाने आपल्याला खिळवून ठेवले. 4G चा सरासरी वेग 12mbps इतका आहे. आता मात्र या सर्वांच्या पुढची जनरेशन म्हणजे 5G येत आहे. याचे स्पीड साधारण 20gbps इतके भयानक असणार आहे. 2019 च्या शेवटीपर्यंत 5G भारतात येईल. याचा अर्थ असा की 4G सर्वत्र पोहचयच्या आधी 5G भारतात येईल. 4G पेक्षा 20 पट वेग वाढल्यामुळे कोणतीही माहिती पाठवण्यासाठी 1 मिलीसेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. 5G मुळे देशातील बहुतेक सुविधा इंटरनेट च्या माध्यमातून पुरवल्या जातील. सेल्फ ड्राइविंग कार, रिमोट कंट्रोल सर्जरी, आर्थिक व्यवहार जास्त सोपे होतील.
5G च्या बातमीमुळे पोरं मात्र जाम खुश आहेत. येणाऱ्या स्पीड ची कल्पना करून 5G ची आतुरतेने वाट बघत आहेत कारण आपल्याला 'थोडा और' पाहिजच असते. आत्ताच कामाच्या व्यापात पोरांना 1.5Gb डाटा पुरत नाही. बघू 5G आल्यावर काय होते ते पण या 3G, 4G,5G च्या नादात जीवनातील 'जी' मात्र हरवता काम नये.
-----------------------------------------------------------
संदीप.....
sandip.koli35@gmail.com
Sunday, 3 June 2018
भारतात 5G येणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
मन ही आवरायला घेऊया
वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...
-
वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...
-
🌸भावनाशून्यतेच्या जगात.. आकाशगंगेच्या मनात आले नि ग्रहांच्या फिरण्याबरोबर त्यांना नवनिर्मितीचा नाद लागला. मंदाकिनीमधील आठ ग्रहांपैकी पृथ्वी...
-
पुस्तक परीक्षण- लपवलेल्या काचा – डॉ.सलील कुलकर्णी ‘ मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी...
No comments:
Post a Comment