Tuesday, 31 December 2024

आज : Today

📝 आज.......
      आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो. 
          अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे. 
          आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label  लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
         "So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
               "छोडो कल कि बाते,
                कल कि बात पुराणी।
                छोडो कल कि बाते
                कल कि बात है आनी।
                नए आज में लिखेंगे,
                 हम नई कहाणी।"
           आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......

आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....

Sunday, 30 June 2024

Leave while you are at the top of the game

🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏

29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर्षापासून असलेल्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ रोहित आणि टीमने संपवला आणि पूर्ण देशातच एक जल्लोष सुरू झाला. खरेतर सातत्याने इतकं छान क्रिकेट खेळत असताना " हाथ आया लेकिन मुंह ना लगा।" अशी अवस्था भारताची होत होती. गेल्या वर्षभरात भारत तीन वेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनल पर्यंत पोहोचला पण यशाला गवसणी घालण्यापासून काही क्षणांनी मात दिली होती, पण आज तो सुवर्णक्षण अवतरला आणि भारतीय टीमने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 
           भारतीय टीम ही सातत्याने अतिशय उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती त्यामुळे आजचा सामना हा भारतीयांसाठी प्रचंड महत्त्वाचा होता. एकीकडे भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा अभिमान आणि कौतुक होत असताना दुसरीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी T20 मधून घेतलेली निवृत्ती ही सुद्धा मनाला कुठेतरी बोचणी लावून जाणारी आहे. भारतीयांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू. 
        पण का??? दोघेही इतका चांगला खेळ खेळत असताना अचानक अशा निवृत्तीची गरज होती का??? त्यांनी अजून काही वेळ वाट बघायला पाहिजे होती का??? 
         नाही.... त्यांनी घेतलेला हा निर्णय माझ्यामते सर्वोत्तम आहे. तुम्ही अशा वेळेला निवृत्ती घेत आहात की ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असाल तर निवृत्ती तुमच्यासाठी खूप फलदायी ठरत असते. रोहित व विराट सध्या या प्रकारात सर्वोच्च स्थानावर आहेत. अजून काही काळ ते खेळत राहतील. अतिशय उत्तम ही खेळतील यात शंका नाही, पण आज जो क्षण त्यांच्या आयुष्यात आला आहे तो पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही आणि अशा वेळेला सर्वोच्च शिखरावर असताना त्यातून बाजूला होणं ही खूप मोठी उपलब्धि दोघांनी साधली आहे. 
          या निर्णयामुळे ज्या- ज्या वेळेला t20 फॉरमॅटचा उल्लेख होईल त्यावेळी या दोघांची नावे तितक्याच अभिमानाने घेतली जातील. त्यांचा हा निर्णय सर्व क्षेत्राला लागू पडतो. तुम्ही ज्या वेळेला यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतात त्यावेळेला तिथून बाजूला जाणे हेच तुमचे खरोखरच यश असचे. Leave it when you are at peak. 
          रोहित आणि विराट या पुढेही भारतीय क्रिकेटसाठी कसोटी आणि वनडे च्या माध्यमातून योगदान देत राहतील यात शंका नाही. त्यांच्याकडे अजून खूप खेळ बाकी आहे याबद्दल खात्री आहे. दोघांनाही कसोटी व वनडे फॉरमॅटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि t20 साठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद.....
        भारतीय संघ आणि रोहित टीमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन..

✒️ संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com

Thursday, 13 June 2024

जरा विसावू या वळणावर......

जरा विसावू या वळणावर......

 

                         दररोज आपल्याला जाग येते ती मोबाईलच्या गजरने... डोळे चोळत उठता उठता कधी मोबाईलचा डेटा On होतो कळत ही नाही. मग रात्री 11-12 ला बंद झालेली नोटिफिकेशनची टिक- टिक पुन्हा भरभर वाजू लागते. सगळी शोधा शोध झाल्यावर लक्षात येते की रात्रीत फारसं नवीन काही झालेलच नाही. मग थोडेसे हायसे वाटते. कोणाचा वाढदिवस? कोणाला शुभेच्छा? कोणाचे अभिनंदनाचे स्टेटस ठेवल्यावर आपल्याला प्रवाहात आहे याचे कौतुक वाटते आणि दिवसाचा प्रवास सुरू होतो.

                   सकाळचे आपले आवरून 15 - 20 मिनिटांपूर्वी ठेवलेला फोन पुन्हा हाती येतो व आपण जगाशी जोडले जातो. स्टेटस, मेसेज आणि नोटिफिकेशनच्या माध्यमातून मित्र, परिवार आणि दुनिया आपल्या डोळ्यासमोर दिसते. दिवसभर काम, प्रवास, भेटी, कार्यक्रम या ना अशा अनेक कामात आपण सतत व्यस्त असतो.

                 कोणाची भेट झाली की... काय? काय? च्यापुढे आपला संवाद जात नाही. आपल्याला गडबड असते. नंतर भेटतो. जरा गडबड आहे. अशा सबबी सांगून आपण काढता पाय घेतो.  समोर असणाऱ्या किंवा आपल्याला भेटावेसे वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्याला वेळ देता येत नाही.

            जगण्याच्या प्रवासात आपण इतके व्यस्त झालोय की समोर आहे त्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करून आपण पुढे जातोय. एक आयुष्य आहे व आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत हे 100% मान्य, पण हे So Called सगळे मिळवण्यात आपली स्वतःची ओढाताण तर होते, पण ज्याच्यासाठी आपण धावतोय ते सर्व आपल्याला सापडतही नाही आणि सापडलेच तरी आपले समाधान होत नाही. 

               जगण्याच्या धावपळीत कुठेतरी थोडं थांबून, थोडा विसावा हा तितकाच गरजेच आहे. जगाचे चक्र हे कायम सुरूच असणार आहे. कितीही जोरात धावलो तरी सर्वच ठिकाणी असणे व मिळणे कठीणच. फक्त या धावपळीत आपली फरपट होऊ नये इतकेच महत्त्वाचे. 

                पुढे जाणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असले तरी आपल्या सोबतच्यांना पुढे घेऊन जाणे किंवा आपल्याबरोबर असणाऱ्यांसाठी वेळ देणं ही तितकच महत्त्व आहे. नंतर फोन करतो. नंतर भेटूया. नंतर बघूया. 

                सध्या गडबडीत आहे, वेळ नाही ही कारणे बाजूला ठेऊया. जगण्याच्या या शर्यतीत नंतर कुणालाच वेळ मिळत नाही व ती वेळ गेल्यावर अपराधीपणाची भावना कायम आपल्या सोबत राहते म्हणून नंतरपेक्षा आत्ता बोलूया, आत्ता भेटूया, आत्ता बघूया हे महत्त्वाचे आहे.

            गीतकार सुधीर मोघेंच्या गीताच्या सुंदर ओळी मला खूप आवडतात...

    'भले बुरे जे घडून गेले'

    'विसरून जाऊ सारे क्षणभर'

    'जरा विसावू या वळणावर....

    'जरा विसावू या वळणावर....

 

                      जगण्याच्या प्रवासात कुठेतरी थोडासा स्वल्पविराम घेऊन थोडसं थांबून स्वतःसाठी व जवळच्यांसाठी विसावा घ्यायला  नक्कीच हरकत नाही.

 

संदीप कोळी

sandip.koli35@gmail.com



 

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...