📝 पहिल्यापासन आम्हास्नी ना एस.टी, गाडी च्या खिडकीतन चिप्स खाऊन झालेला कागद, केळाचं साल, भडांगाचं रिकामं कागद, पेप्सीबीचं कागद बाहेर फेकायची भारी हौस. मग ते कुटं घाटात असणा नाहीतर शरात असणा. तेच्या बी पेक्षा भारी टॅलेंट आमच्यात हाय अनं ते म्हंजी आम्ही भर रस्त्यात चालत्या कार गाडीचा दरवाजा हळूच उघडून पिचकारी मारायचं. तसं बी असलं भयानक टॅलेंट जगाच्या पाठीवर फकस्त आमच्यातच. उगच नाही भारत टॅलेंटची खाण.
जिन्यातन उतरताना कोपऱ्यातली पिचकारी, नाट्यघर, सिनेमाची टाकीत बसायच्या सीट खाली केलेली घाण, एस.टी, रेल्वे सगळीकडे आम्ही असल्या लई करामती केल्याती. अ हं अन ते भी कुणाला भिऊन नाय तर दाबात.....
अन अशीच आमची परगती राहिली तर आपल्या परधान सेवकांच्या स्वप्नां परमानं ते स्वच्छ भारत अभियान का काय ते 2019 काय आम्ही ठरवलं तर अजून बरीच साल हून बी देणार नाय.
तसा आमचा या स्वच्छ भारत ला इरोध नाय हाय पण काय पण झालं तरी आम्ही आमचं टॅलेंट बी वेस्ट जाऊ देणार नाय.....
जय हो.....
🖋 संदीप.....
Friday, 26 May 2017
आम्हाला स्वच्छता आवडत नाही......
Subscribe to:
Post Comments (Atom)
मन ही आवरायला घेऊया
वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...
-
वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...
-
🌸भावनाशून्यतेच्या जगात.. आकाशगंगेच्या मनात आले नि ग्रहांच्या फिरण्याबरोबर त्यांना नवनिर्मितीचा नाद लागला. मंदाकिनीमधील आठ ग्रहांपैकी पृथ्वी...
-
पुस्तक परीक्षण- लपवलेल्या काचा – डॉ.सलील कुलकर्णी ‘ मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी...
No comments:
Post a Comment