Wednesday, 22 July 2020

करोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची Corona- a cataclysm or opportunity of innovation


करोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची
        
                      माणूस म्हणजे विज्ञानाचा होमो सेपियन सेपियन. जगातील सर्वात बुद्धिमान बुद्धिमान प्राणी. होय दोन वेळा बुद्धिमान कारण जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटकांचा आपल्या स्वतःसाठी उपयोग करून घेणारा एकमेव प्राणी. जीवसृष्टी अस्तित्वात आली त्यावेळी प्रत्येक सजीव प्राण्यांनी आपल्या विकासाची गती हळू ठेवली होतीपण मानवाची उत्क्रांती झाली आणि तो इतर प्राण्यांच्या तुलनेत उसेन बोल्ट बनला आणि सर्वांना कित्येक पटीने मागे टाकून विकासाचीप्रगतीची नवनवीन शिखरे त्याने सहज सर केली.
                      पृथ्वीवरची प्रत्येक शक्य गोष्ट मानवाने आपल्या फायद्यासाठी वापरली. इतर प्राण्यांना शक्य नव्हते अशा वातावरणातपरिस्थितीतही त्याने आपले कौशल्य पणाला लावून त्यावर मात केली. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर नव्हे तर अगदी ओरबाडून वापर केला. हे करत असताना मात्र मानवाने निसर्गाचापर्यावरणाचा व आपल्या इतर सजीवांचा कधी विचारच केला नाही. मदमस्त प्राण्याप्रमाणे त्याचा एकंदर वावर होतापण अचानक एक दिवस तो आजारी पडला आणि त्याला कळाले की त्याला covid-19 नावाचा आजार झाला. कारणांचा शोध घेतला त्या वेळी कळले की हा आजार करोना नावाच्या विषाणूमुळे झाला आहे. शिवाय संसर्गजन्य आहे. आता मात्र माणूस घाबरला. त्यांने उपाय शोधायला सुरुवात केलीपण जालीम उपाय सापडेना. सजीव व निर्जीव नसलेल्या या विषाणूने मानवाला चांगलेच अडचणीत आणले. माणसाने त्यावर उपाय शोधला तो म्हणजे लॉक डाऊन. स्वतःला इतरांपासून वेगळे करून आपण यातून बाहेर पडू शकतोपण यालाही आता खूप वेळ झाला आहे. जगभरात या विषाणूने कोट्यावधी लोकांना बाधित केले आहे व लाखो लोकांचा बळी घेतला आहे. हे आकडे अजूनही वाढतच आहे.
                    मानवाच्या चुकीमुळे आलेला हा विषाणू मानवाच्याच र्‍हासाला कारणीभूत ठरत आहे. याने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. मानव यातून बाहेर नक्कीच पडेलपण या करोनाच्या निमित्ताने काही गोष्टी नक्कीच अधोरेखित कराव्या  लागतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते “ The  earth has enough resources for our need but not for our greed. ”  सध्याची परिस्थिती काहीशी अशीच झाली आहेआपल्या अति हव्यासापायी आपणही महामारी ओढावून घेतली आहे.
                  सध्या देशात व जगात अनेक भागात लॉक डाऊन असल्यामुळे या परिस्थितीविषयी अनेक विचारअनेक मते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. करोना या प्रलयामुळे अनेक अडचणींना जगाला सामोरे जावे लागत आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था बुडाल्या आहेत. आर्थिक हानी झाली आहे. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. अनेक प्रगत देशांच्या वैद्यकीय सेवांची कमतरता समोर आली आहे. विकसनशील देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. अनेक देशात आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा अनेक अडचणी व आपत्ती करोनामुळे सर्व देशांच्या समोर उभ्या आहेत. याची चर्चा आपण टीव्हीइंटरनेट व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून सतत ऐकत आहोत. त्यामुळे या प्रलयाची हानीकारक बाजू आपल्यासमोर आहेचपण each coin has two sides त्याप्रमाणे या करोनाच्या प्रलयाला जशी विनाशाची किनार आहे,  त्याप्रमाणे यातून आशेचा किरण ही पाहायला मिळत आहे.
                 जगात गेली काही महिने व आपल्याकडील लॉक डाऊन अनेक सकारात्मक गोष्टी शिकवत आहे. याविषयी आपण विचार करायला हवा. करोना  व्हायरसमुळे आलेल्या या आरोग्याच्या जागतिक महायुद्धाने एक गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक शिकवली ती म्हणजे आपण कितीही प्रगत झाला तरी निसर्गाला मात  देऊ शकत नाही. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ या आपल्या मराठी म्हणीप्रमाणे निसर्गाने आपल्या चुका आपल्यावर उलटवल्या आहेत. यातून आपण वेळीच सावध व्हायला हवे. आपला हव्यास दूर करून निसर्ग व सर्व सजीवांची आपण मोठ्या भावाप्रमाणे काळजी घ्यायला हवी. ही नवी संधी यानिमित्ताने निसर्गाने आपल्याला धडा शिकून दिली आहे. या लॉक डाऊनच्या निमित्ताने आपल्या लक्षात आले असेल की आपल्याला ‘जगायला कमी आणि दाखवायला जास्त मिळवावे लागते.’ तसे बघायला गेले तर आपल्या जगण्याच्या गरजा मर्यादित आहेतपण त्याच्या इतर अनावश्यक वलयापाठीमागे आपण खूप धावत असतो. हे या काळात अधोरेखित झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण याच गरजांच्या गोष्टींना महत्त्व देण्याची नव्याने संधी आपल्याला मिळाली आहे. एका घरातील अनेक वाहनेसार्वजनिक वाहतूक याशिवाय इतर वाहने त्यामुळे वाढलेले प्रदूषण या काळात एकदम कमी होऊन हवा शुद्ध झाली आहे ही गोष्ट आपल्याला नवी संधी देते की आपण आता तरी शहाणे होऊ खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर करायला हवा व पर्यावरण जपायला हवे. या लॉक डाऊनच्या काळात अनेक नद्या शुद्ध झाल्या हे दाखवते कि पाण्याच्या प्रदूषणाला आपणच जबाबदार होतो व  आहेत ते कमी करण्याची नवी संधी निसर्गाने आपल्याला दिली आहे.
                या लॉक डाऊनमुळे आपल्याला आपल्या माणसांबरोबर वेळ घालवता येऊ लागला आहे. सध्या धावपळीत व स्मार्टफोनच्या जमान्यात दुरावलेली नाती यानिमित्ताने पुन्हा जवळ येऊन त्याची वीण पुन्हा घट्ट झाली असेल. आपल्याला हे नक्कीच समजले आहे की पैसाप्रतिष्ठावस्तू या आपल्या वापरासाठी आहेत व आपल्याला भावनिकमानसिक आधार देऊ शकत नाही. मात्र आपली माणसे हीच मोठी संपत्ती आहे. जी आपण दुरावत चाललो होतो. करोनाने पुन्हा नवी संधी दिली आहे आपली नाती दुरुस्त करण्यासाठीची.
                करोनाच्या या प्रलयात आपले बरेच नुकसान व तोटे झाले असले तरी निसर्गाने आपल्याला उदाहरणासह चांगला धडा शिकवून कमतरतेची जाणीव करून दिली आहे.
निसर्ग किमया दृष्टीसुख छान। अद्वैताचे भान मानवास।
वृक्षवल्ली तृण हिरवे कुरण। चरणास रान मुक्या जीवां।
परोपकार हा शिकवी निसर्ग।  धरत्रीचा स्वर्ग।जपुयात।
               या आरोग्य महामारीच्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडून निसर्गाने दिले यांना या संधीचा आपण सकारात्मक उपयोग करून निसर्गाचा समतोल राखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. निसर्गातील इतर सजीव प्रमाणे आपण पृथ्वीच्या घटक असून मालक नाही याची पुन्हा एकदा आठवण करून देऊन आपल्याला मर्यादित राहण्याची ही नवी संधी निसर्गाने आपल्याला दिली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------- 
श्री. संदीप भिमराव कोळी
 9730410154
 sandip.koli35@gmail.com





8 comments:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...