सोशल दु:ख
नमस्कार.......
नमस्काराने सुरुवात केली कारण आज थोडा वेगळाच आणि जवळचा विषय आहे. आपण
सर्व-जण
सध्या वेगवेगळी समाजमाध्यम
आवडीने वापरतो,
किंबहुना ती आपल्या
सवयीचा भाग बनली आहेत. या समाज माध्यमावर अनेक माहितीची देवाण-घेवाण
सुरू असते. दिवसभरामध्ये हजारो मेसेजच्या गराड्यात आपण
गुरफटलेले असतो.
व्हाट्सअप,
फेसबुक,
इंस्टाग्राम,
ट्विटर, यु-ट्युब यासारख्या अनेक
समाज माध्यमावर उपस्थित राहणे,
तिथल्या अपडेट घेत राहणे व आपण सोशली ॲक्टिव आहोत हे
दाखवण्यात अक्षरश:
आपली दमछाक होते.
त्यात या सर्व समाज
माध्यमावर दररोज वेगवेगळे ट्रेंड
असतात.
ह्या दररोजच्या नवनवीन ट्रेंड प्रमाणे ॲक्टिव राहून आपले
स्टेटस दाखवण्याची घाई अगदी धावपळीची आणि त्रासाची असते. तरीही हे सर्व त्रास सहन करून
देखील आपण त्यात तरून राहतो हे आपले
कौशल्य कौतुकास्पद आहे.
हे झाले नमनाला घडाभर तेल.........., पण
खरा विषय वेगळाच आहे आणि तो आपल्याही लक्षात आला असेल. या विविध समाज माध्यमावर
सोशली अॅक्टिव राहण्याच्या प्रयत्नात आपण आपले जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या खास
बाबी मिस करतोय.
तसे बघायला गेले तर आज प्रत्येक जण अशा खास बाबी समाजमाध्यम वर देखील शेअर
करतात,
पण आपण सर्व शोधण्याच्या गडबडीत
त्या ही मिस करतोय किंवा काही वेळा उत्तर द्यायला कंटाळा करतोय, पण
मेसेज पाठवणारा किंवा स्टेटस ठेवणारा मात्र हे आवर्जून लक्षात
ठेवतो.
माझे एक स्पष्ट मत किंवा निरीक्षण
आहे.
जेव्हा अशा समाज माध्यमावर फेरफटका मारत असताना
आपण एखाद्याच्या सुख-दुःख, यश-अपयश, वाढदिवस, महत्वाच्या बाबी यांची स्टेटस
काळजीपूर्वक पहावी व
त्याचा योग्य संदर्भ घेऊन प्रतिसाद द्यावा. जर आपल्याला हे शक्य नसेल तर आपण असे स्टेटस किंवा अशा पोस्ट टाळलेल्या बऱ्या निदान मेसेज पाठवणाऱ्या
किंवा स्टेटस ठेवणार्याला
त्याचा विनाकारण त्रास होणार नाही.
आता खरा कळीचा मुद्दा...... तुम्ही
म्हणाल यात गंभीर काय आहे?
आम्ही बघतोय की... आम्हाला माहिती असते की.... पण खरी
गंमत पुढे आहे.
ज्यावेळी एखादी व्यक्ती आपला आनंद, दुःख, यश, अपयश, वाढदिवस, महत्वाच्या बाबी या निमित्ताने
स्टेटस अथवा पोस्ट पाठवतो वेळी
पाहणाऱ्याकडून अथवा ज्याला पाठववलेले, त्याच्याकडून योग्य प्रतिसादाची अपेक्षा करते. हे मानसशास्त्रीयदृष्ट्या
सर्वांच्या बाबतीत घडत असते, पण
समोरच्याकडून अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर
त्यांच्या मनात नकारात्मकता निर्माण व्हायला सुरुवात होते. हे खरे सध्याचे सोशल दु:ख आहे. सध्या आपण या
व्हरच्युअल जगाचा एक अविभाज्य भाग व हे व्हरच्युअल जग आपल्या आयुष्याचा एक
महत्वाचा हिस्सा बनले आहे. तुम्ही किती नाही म्हणाला तरी आपल्याला अपेक्षित
प्रतिसाद नाही मिळाला,
तर हे प्रत्येकाच्या
बाबतीत होतेच आणि मग हे साठत जाऊन
त्याचा त्रास होतो. सध्या तर Lockdown
च्या या काळात अशा नकारात्मकता व एकटेपणाची भावना अधिक गडद होते. याचे प्रमाण
प्रत्येकाचे वेगवेगळे असेले तरी सतत याच विचारात राहण्याऱ्यासाठी हे गंभीर होऊ
शकते.
आता मुद्दावर उतारा ....... अशा समाजमाध्यामावर
सोशली ॲक्टिव राहत असताना आपण प्रतिसाद देण्याची
ही काळजी जरूर घेतली तर आपले मित्र, जिवलगांची व कधी-कधी आपल्यातील ही नकारात्मक जरूर कमी व्हायला मदत होऊल. शेवटी जे मी नेहमी म्हणतो......सोशल
मिडिया आपल्याला जेवढा सोसेल तेवढाच वापरावा म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
९७३०४१०१५४
sandip.koli35@gmail.com
✍️👌🌹🌹👍
ReplyDeleteThank you 👍
Deleteसध्याचे वास्तव��������
ReplyDeleteYes
DeleteVery nice article...
ReplyDeleteThank you 👍
DeleteTruely said by you ...its correct ...fact n reality
ReplyDeleteThank you 👍
DeleteThank you 👍
ReplyDelete