📝आदरणीय गुरूवर्य…..
गुरू, कोणाला म्हणणार आपण गुरू?...
आपलं जगणं घडवणारा ,
पावलांना बळ देणारा ,कठीण वाटेवर मुददाम नेऊन सोडणारा.
पण गुरू म्हणजे आधाराची कुबडी नव्हे.हात पसरून मदत मागत बसायची जागा नव्हे.
तो जगायला शिकवतो. तो लढायला शिकवतो.
त्यांनी पाठीवर हात ठेऊन नुसतं लढ म्हंटलं तरी अंगात दहा हत्तींच बळ येतं
आणि मनाच्या गाभायात चैतन्याचा संचार होतो अन प्रेरणांना उधाण येतं.
गुरू कोठेे भेटाव..... आपल्याच माणसात अन आपल्याच सभोवती......
आपणही माझ्या आयुष्यात असेच आलात.आपली भेटही अशाच एका वळणावर झाली. आपण मला वाट दाखवलीत..विचारांची पदधती शिकवलीत. चुकिच्या विचारांची पदधती बदलून पहायला शिकवलीत. आपण मला प्रश्नांच्या गर्दीत सोडलत. उत्तरे माहित असुनही ती मला शोधायला लावलीत. विचारांच्या विशाल जगात आपण मला स्व:ताची स्वतंत्र पायवाट शोधायला शिकावलीत. प्रसंगी आधार दिला व जबाबदारीही. ठेच लागुन पडलो तर आधार ही आपणच दिलात व उठून पुन्हा मार्ग चालण्याचे बळही आपणच दिले. वाटेत अडचणी आहेत धोके आहेत म्हणुन मागे न फिरता ध्येयापर्यंत चालायचं हे ही आपणचं शिकवलत.स्व:तचे निर्णय स्व:त घेऊन स्व:ताच्या मनासारख जगायला आपण शिकवलत. कष्ट करूनही आनंदात जगायला आपण शिकवलत.
जग बदललं काळ बदलला तरी आपलं मोल कमी होणार नाही.कुठलच यश एकटयाचं नसतं.आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणायाकडून काहीना काही चांगल घ्यावं हे आपण शिकवलत.
म्हणूनच गुरूपौर्णिमेच्या या मंगल दिनी आपल्या ऋणात राहून आपल्याविषयी कॄतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न…..
गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.....💐💐
🖋संदीप.....
No comments:
Post a Comment