हुश्श, झाली एकदाची exam. खरे तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अशा exam वारंवार येत असल्या तरी प्रत्येक वेळी exam झाल्यावर एव्हरेस्ट सर केल्याचा फील नक्की येतो. शिवाय exam च्या आदल्या दिवशी रट्टा मारून अभ्यासाचा ताण प्रचंड असतो. हा ताण घालवण्यासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांसोबत एक सेलिब्रेशन ट्रीट तर बनतेच ना बॉस....
आणि परवा ह्याच ट्रीट साठी गॅंग कॅन्टीन मध्ये जमली, आता गॅंग जमली म्हणजे गप्पा-टप्पा आल्या. शिवाय exam मुळे सिरीयस वातावरणामुळे वायफळ गप्पाच झाल्या नव्हत्या त्या एकदम सुरु झाल्या. आता कॉलेज च्या पोरांच्या गप्पा म्हणजे फॅशन, बॉलीवूड आणि क्रिकेट. त्यातच परीक्षेचा कंटाळा घालवण्यासाठी पिक्चर ला जायचा विषय निघाला आणि गप्पांचा टॉपिक सिनेमावर आला. 'सच्याने ' सुरुवात केली "काही नाही रे सध्या पिक्चर मध्ये सगळीकडे वादच चालू आहे. 'विक्याने' पण सूर ओढत "होय रे दीपिका,शाहिद,रणवीर च्या पद्मावतीचा वाद जोरात सुरु आहे रे. तोपर्यंत राहुल्याने पण त्यात उडी घेतली " होय रे मराठीत पण चर्चा सुरु आहे. 'दशक्रिया' आणि रवी जाधव सरांचा 'न्यूडं' याही दोन चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीचे वातावरण तापवून टाकले आहे. यावर "ते सगळे काहीही असो आपण चित्रपट मनोरंजनासाठी बघतो ना, मग संपला विषय म्हणत "साक्षीने' कमी शब्दात आपलीही प्रतिक्रिया दिली.
अशीच चर्चा तुमच्याही ग्रुप, कट्ट्यावर सध्या ऐकू येत असतील. सिनेमा हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो मग तो नट-नटी यांच्यामुळे, सिनेमाच्या विषयामुळे, त्याच्या कमाईमुळे किंवा त्याच्या वादामुळे. सिनेमा आणि वाद हे काही नवीन नाही. याआधीही असा वाद आणि विरोध अनेक वेळा झाले आहेत. पण सध्या हा वाद बहुचर्चित पद्मावती आणि मराठीतील दशक्रिया व न्यूड या दोन सिनेमामुळे पुन्हा एकदा वर आला आहे. पूर्वी पासून आपल्याकडे सिनेमाचा एक ढाचा तयार झाला आहे. त्यात कॉमेडी, ट्रॅजिडी, गाणी , मसाला यांचा भरणा करून तो आपल्यापर्यंत सर्व केला जातो. बरेच डायरेक्टर यात फार बदल न करता सिनेमा बनवतात. पण अलीकडच्या काळात काही डायरेक्टर प्रयोगशील झाले आहेत. यातून वेगळ्या आशयाचे व धाटणीचे सिनेमे तयार करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. असे सिनेमे गाजतात व प्रेक्षकांना आवडतात ही. पण या प्रयोगशीलतेमुळे काही वेळा वादाचे प्रसंग येतात. सिनेमाचा आक्षेपार्ह विषय किंवा काही प्रसंगामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन त्या सिनेमाला विरोध होतो.
मूळतः सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. आपल्या समाजात घडणाऱ्या घटना यांचा आरसा सिनेमा आपल्या समोर उभा करत असतो. सिनेमाचा आशय व त्याच्या सादरीकरणामुळे समाजातील विविध दुर्लक्षित व महत्वाचे विषय आपल्यासमोर येतो. पण अशा बोल्ड विषयामुळे सिनेमाविषयी नाराजी वाढते. पण सिनेमात असे वेगळे विषय व नवीन प्रयोग व्हायला हवेत. हॉलिवूड शी तुलना करता टिपिकल मसाला पटातून बाहेर पडून नवीन विषयाचे सिनेमे व्हायला हवेत. हा त्याविषयी कॉन्टरवसी कमी व्हायला हवी. आपण कशासाठी सिनेमा पाहतो व तो कोणत्या अँगल ने पाहतो हे महत्वाचे बाकी टीका आणि कौतुक हे दोन्ही होतच असते.
या गंभीर चर्चेचा गोलमाल अगेन आणि अगेन चालूच राहणार. कारण Any publicity is good for publicity. त्यामळे सिनेमा चर्चेत राहतो. आणि अपने को तो सिर्फ एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट चाहिये और सिनेमा एंटरटेनमेंट है........
-----------------------------------------------------------------
संदीप कोळी
No comments:
Post a Comment