माझी भाषा : राजभाषा मराठी
Today is मराठी भाषा day...फुल्ल सेलिब्रेशन करायचं, खूप प्रोग्रॅम्स आहेत आपल्याकडे.
होय ना.... हल्ली असंच मराठी बोलतो आपण.
आधुनिकीकरण आणि आपले
भाषाज्ञान दाखवण्याच्या वेडात आपण भाषेची पूर्ण भेसळ करून टाकतो. याला आधुनिकतेची
किनार लावली की झालो आपण भाषासमृद्ध असेच बऱ्याचदा आपल्याला वाटते. पण तसं नाही.
मराठीच नव्हे तर जगातील प्रत्येक भाषा वेगळी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्या भाषेची विविधता आहे, गोडी आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे, साहित्य
आहे. एकूणच तिला स्वतंत्र अस्तित्व आणि मान आहे. पण आपण काय करतो सगळ्याची मोडतोड
करून विचित्र भाषा जन्माला घालतो आणि तिचेच कौतुक करतो.
परवा
रेडिओ वर एक वाक्य ऐकले " काल मी गोष्ट read केली." या वाक्यात read
ऐवजी वाचली असा शब्द वापरला असता तर काय बिघडले असते पण नाही भाषा
बिघडवण्याचा छंदच लागला आहे सध्या.
माझा कोणत्या भाषेला विरोध नाही. पण तिचा वापर योग्य झाला पाहिजे.
आज राजभाषा मराठी दिन आपल्या
सर्वासाठी अभिमानाची बाब. पण ती फक्त आजच्या दिवसासाठी नसावी तर ती कायम राहावी.
संत ज्ञानेश्वर म्हणतात "अमृताशी पैजा जिंकेल मराठी माझी" आणि अशी
समृद्ध भाषा आपली मातृभाषा आहे याचा अभिमान आहे. इतर भाषा यायला पाहिजेत शिकायला
पाहिजेत हे 100
टक्के मान्य पण याचा अर्थ आपण आपली भाषा कमी समजणे हे चुकीचे आहे.
सध्या मराठी सोडून इतर भाषा बोलण्यावर मराठी माणसाचा जोर आहे. यामुळे आपणच आपली सुंदर भाषा दुर्लक्षित करतोय. मराठीत पण सुंदर बोली भाषा आहेत मालवणी, कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, पुणेरी, विदर्भ, यासारख्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेची आपली स्वतंत्र गोडी व नावीन्य आहे. ते आपण जपले पाहिजे. ग्रामीण भाषा बोलले म्हणून कोणी गावंढळ होत नाही तो आपण केलेला गोड गैरसमज आहे.
आपण बोलताना शक्य तेवढ्या मराठी
शब्दचावापर करायला हवा हा आता पर्यायच नसेल तर इतर भाषेतील शब्द वापरणे
क्रमप्राप्त ठरते.
असो..... मराठी भाषेवर प्रेम
करणाऱ्या व मराठीचा अभिमान असणाऱ्या सर्वांना राजभाषा मराठी दिनाच्या मराठीतून खूप
खूप ............
🖋 संदीप कोळी....
Sandip.koli35@gmail.com